राम मंदिराचा प्रश्न 24 तासांत सोडवू: योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath
Yogi Adityanath

लखनौ : अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशातील नागरिकांची सहनशीलता संपत चालली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी लवकरात लवकर निकाल द्यावा, अन्यथा आमच्या हातात हे प्रकरण सोपवावे. आम्ही 24 तासांत हा प्रश्न सोडवू, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा राम मंदिरावर मोठे विधान केले आहे. राम मंदिराचा प्रश्न तुम्ही चर्चेतून सोडवणार का?, की अन्य दुसऱ्या मार्गाने?, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारल्यावर त्यांनी हे वक्तव्य केले. राम मंदिराचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा, अशी जनतेची मागणी आहे. राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यास सर्वोच्च न्यायालय असक्षम असेल तर त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे सोपवावे, आम्ही २४ तासांत हा वाद निकाली काढू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

आदित्यनाथ म्हणाले, की न्यायालयाने लवकरात लवकर हे प्रकरण सोडवावे, अशी माझी विनंती आहे. विनाकारण मालकी हक्कासाठी अयोध्या वाद लांबवला जातोय. सर्वोच्च न्यायालयाने जनतेच्या हितासाठी आपला निर्णय जाहीर करावा. परंतु, विनाकारण याला उशीर होत असेल तर जनतेचा न्यायालयावरून विश्वास उडेल. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 2014 पेक्षा अधिक जागा मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com