'शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीच नाही'

'शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीच नाही'

नवी दिल्ली- देशात 2015 पासून शेतकरी आत्महत्येची आकडेवारी उपलब्ध नसल्याच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो-एनसीआरबी) माहितीमुळे नाराज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोपही केला आहे.

शेट्टी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मागितल्यानंतर "एनसीआरबी'ने असमर्थता व्यक्त करणे हा सरकारचा बेजबाबदारपणा आहे. सर्व जन्म-मृत्यूंची नोंद ठेवणे स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसाठी तसेच गुन्ह्यांची नोंद ठेवणे "एनसीआरबी'साठी बंधनकारक आहे. यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचीही नोंद ठेवली जाणे अपेक्षित आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगणे म्हणजे अशा आत्महत्या थांबल्या आहेत की सरकारला या आत्महत्यांची चिंता नाही, असा प्रश्‍न शेट्टी यांनी केला आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी तातडीने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी जमा करावी, असे आदेश पंतप्रधानांनी सरकारी यंत्रणेला द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com