अंडी खाणारी मुले नरभक्षक बनतील

अंडी खाणारी मुले नरभक्षक बनतील

भोपाळ : मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांच्या सरकारने अंगणवाडीतील मुले आणि गर्भवतींना अंडे देण्याचा अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मांसाहार करणे निषिब्ध आहे. जर लहान वयातच मुलांना अंडे खाण्याची वाईट सवय
लावली तर पुढे जाऊन ते नरभक्षक होतील, असे वक्‍तव्य भाजपचे नेते गोपाल भार्गव यांनी केले आहे. 

लहान मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी देण्यात येत असलेले बहुगुणी अंडे अंगणवाडीतील मुलांना देण्यास मध्य प्रदेशमध्ये भाजपने विरोध केला आहे. मुलांना पोषण आहार देण्यासाठी अनेक पर्याय आहेत. अंगणवाडीतील मुलांना अंडे देण्याचा विचार यापूर्वी अनेकदा समोर आला आहे.

भाजपचे सरकार असताना हा विषय समोर आला होता. मात्र, आपली संस्कृती शाकाहारी आहार करण्याची आहे. अंडे हा एक मांसाहार करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मी याला विरोध केला होता, असे गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे. भार्गव यांच्याअगोदर राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनीही विरोध केला आहे.

web title : Children who eat eggs will become cannibals

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com