नवी दिल्ली : देशात लष्करात (Army) भरतीबाबत अग्निपथ योजनेवरून (Agnipath Scheme) मोठा गदारोळ सुरु असताना काँग्रेसने (Congress) पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्राच्या या योजनेवर काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, पवन खेरा आणि युवा नेता कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी जोरदार टीका केली असून, अग्निपथ योजना हा नोटाबंदीसारखा निर्णय असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी व्यक्त केले आहे. तर, प्रमोद तिवारी यांनी अग्निपथ योजना म्हणजे नो रँक, नो पेन्शन, ओन्ली टेन्शन असे म्हटले आहे. (Congress Attack On Agnipath Scheme )
अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी
बिहारमधील बेरोजगारीचा दर दुप्पट आहे. तरुणांकडून संधी हिसकावून घेतल्या जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला पिंजऱ्यात ठेवलेले उंदीर समजतात. हा देश गांधींचा देश आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात लष्कर भरतीच्या आंदोलनाला (Protest) काँग्रेस पाठिंबा देत असून, अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे. तसेच तरुणांना हिंसा आणि जाळपोळ न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
तरुण 4 वर्षात निवृत्त झाला तर, लग्न कोणाशी करणार?
जर, अग्निपथ योजनेत सेवा करणारा तरुण 4 वर्षात निवृत्त झाला तर, त्याच्याशी लग्न कोण करणार? असा प्रश्न कन्हैया कुमार यांनी केला आहे. ते म्हणाले की, 47 वर्षांनंतर सर्वाधिक बेरोजगारी मोदी सरकारमध्ये आली आहे. मोदी सरकारने अशी योजना यापूर्वी विरोधी पक्षांना किंवा तरुणांना का विचारली नाही, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याची चेष्टा करू नका असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.