'वॉटर गन की बौछार हो, या गीदड़ भभकी हज़ार हो; राहुल गांधींची सरकारवर कडवट टीका

water canon on farmers
water canon on farmers

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एका कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला आहे. तसेच त्यातून केंद्र सरकारच्या जुलुमावर टीकाही केली आहे. राहुल गांधी यांनी ही कविता ट्विट केलीय. त्यांनी म्हटलंय की, वीर शेतकऱ्यांनो चालत रहा, तुम्ही सरकारच्या जुलुमाला घाबरु नका. द्वारकाप्रसाद माहेश्वरी यांची प्रसिद्ध कविता 'वीर तुम बढे चलो' या कवितेवर आधारित ही कविता राहुल गांधी यांनी ट्विट केली आहे. 

या कवितेत त्यांनी म्हटलंय की, वीरांनो, धीराने पुढे चला. पाण्याचे तीव्र फवारे तुमच्यावर मारले जातील, तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र तुम्ही निडर रहा. घाबरु नका. तुम्ही ठाम रहा. अन्नदाता, तुम्ही धैऱ्याने पुढे चालत रहा. 

काल शनिवारी राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं केंद्र सरकारने ऐकून घेतलं पाहिजे. 

राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला कॅप्शन दिलं होतं की, मातीचा प्रत्येक कण बोलत आहे. सरकारला शेतकऱ्यांचं ऐकावंच लागेल. गेल्या 24 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्यासहित काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली होती. त्यांच्यासोबत गुलाम नबी आझाद आणि अधीररंजन चौधरी होते. गेल्या 26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दोन कोटी लोकांच्या सह्या असणारे एक निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात आले. हे कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com