न्यायाधीश लोयांची पण बदली झाली असती तर...: राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारानंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची रातोरात केंद्र सरकारने बदली केल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यानिमित्त न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचीही बदली केली असती तर असे म्हटले आहे.

गुजरातमधील सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी हृद्यविकाराने मृत्यू झाला होता. 2012 साली हा खटला सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधून मुंबईला हलवण्यात यावा आणि संपूर्ण खटला सुरवातीपासून शेवटपर्यंत एकाच न्यायाधीशाकडून चालवला जावा असे आदेश दिले. त्यानूसार हा खटला मुंबईला हलवण्यात आला पण न्यायाधीश मात्र बदलण्यात आले. सुरवातीला जे. टी. उत्पत न्यायाधीश होते. त्यांच्या कोर्टाने अमित शहा यांना न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले. 25 जून 2014 रोजी न्यायाधीशांची बदली करण्यात आली. त्यानंतर हा खटला न्या. ब्रीजगोपाल लोयांकडे सोपविण्यात आला. 31 ऑक्टोबर रोजी लोया यांनी अमित शहा मुंबईत असूनही सुनावणीस का हजर राहीले नाही? असा प्रश्न करत 15 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली. पण त्याआधीच 1 डिसेंबरला लोयांचा मृत्यू झाला. लोयांच्या मृत्यूनंतर 30 डिसेंबर 2014 रोजी अमित शहांची या केसमधून सुटका झाली.

लोयांच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त होत असताना आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मुरलीधर यांच्या बदलीनंतर लोयांची आठवण केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आज मला न्यायाधीश लोया यांचे स्मरण करावेसे वाटते, त्यांचीही बदली झाली असती तर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com