मोदी जाईल तिकडे खोटे बोलत आहेत : राहुल गांधी

Chandrababu Naidu, Rahul Gandhi
Chandrababu Naidu, Rahul Gandhi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नागरिकांनाही खोटे आश्वासन दिले. त्यांना अजिबात विश्वासहर्ता राहिली नसून, ते जाईल तिकडे खोटे बोलत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज (सोमवार) सकाळपासून आंध्र प्रदेश भवनात एक दिवसाचे उपोषण सुरु केले. चंद्राबाबूंसह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार आणि खासदार हेही उपोषणाला बसले आहेत. राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेश भवनात जाऊन चंद्राबाबूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.

राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधानांनी देशाला दिलेली आश्वासने पूर्ण केले पाहिजे की नाही. तसेच त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे दिलेले आश्वासनही पूर्ण करायला हवे. पण पंतप्रधानांनी आपले आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी कुठेही गेले की आंध्र प्रदेशाबाबत खोटे बोलत आहेत. मोदी नागरिकांच्या भावनांशी खेळत आहेत, त्यांना विश्वासहर्ता राहिलेली नाही. मी आंध्र प्रदेशच्या नागरिकांसोबत उभा आहे. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे. राफेल प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला असून, चौकीदार चोर है.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com