राहुल गांधी यांचे भाकित ठरले खरे!

rahul-gandhi-inc.jpg
rahul-gandhi-inc.jpg

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 17 जूलै रोजी एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी केंद्र सरकारने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलली नाहीत, तर 10 ऑगस्टपर्यंत कोरोनाबांधितांची संख्या 20 लाख होईल, असं भाकित केलं होतं. त्यांचं हे भाकित त्यांनी सांगितलेल्या तारखेअगोदरच खरं ठरल्याचं दिसत आहे. 

भारत ब्राझील, अमेरिकेलाही मागे टाकतोय; देशात, 5 राज्यांमध्ये कोरोनाचा कहर

राहुल गांधी यांनी 10 ऑगस्ट रोजी कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख होईल असं म्हटलं होतं. मात्र, 6 ऑगस्ट रोजी म्हणजे 4 दिवस आधीच कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशात 62,538 नवे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्या पुढे जात 20,27,075 झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. '20 लाखाचा आकडा पार, गायब आहे मोदी सरकार' असा टोला त्यांनी लगावला. 

17 जूलै रोजी भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या पुढे गेला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी  ट्विट करत मोदी सरकारला लक्ष्य केले होते. आज 10 लाखांचा आकडा पार झाला. कोरोनाचे संक्रमण याच गतीने वाढत राहिले, तर 10 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्या पुढे जाईल. सरकारला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस आणि नियोजित उपाय करायला हवेत, असं राहुल गांधी ट्विटमध्ये म्हणाले होते. 

जाणून घ्या कोझिकोडप्रमाणे लँडिंगसाठी धोकादायक असलेल्या देशातील अन्य...

राहुल गांधी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्या पासून केंद्र सरकारवर टीका करत आहे. सरकार महामारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी शनिवारी ट्विट करत पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाने थैमान घातले असताना आशा सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात देशातील 6 लाख आशा सेविकांनी भाग घेतला असून त्यांनी संप पुकारला आहे. या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार आधी मुकं तर होतंच, पण आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालं आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

आशा कार्यकर्त्या देशभर प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सुरक्षा पुरवत असतात. त्या खऱ्या अर्थाने आरोग्य वॉरियर्स आहेत, पण आज त्यांना स्वत:च्या हक्कासाठी संप करावा लागत आहे. सरकार आधी मुकं तर होतंच, पण आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालं आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com