मुंबई: गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी वर्ग आधीच तणावाखाली असताना कोरोना महामारीमुळे त्यांच्या मानसिक ताणात आणखी भर पडली आहे. जगभरात झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. तर, अजूनही नोकरी जाण्याचे सावट कायम आहे. यामुळे कर्मचारी वर्ग मानसिक तणावाखाली येऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून समोर आली.
2016 च्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी तणावाखाली असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जगातील ९९ देशांमधील १४०० कंपन्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजावर झालेल्या परिणामाचा सर्व्हे इंटरनॅशनल एसओएसने इप्सोस मोरी या संशोधन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. या सर्व्हेत भारताचाही समावेश होता.
कोरोनाचा फटका कर्मचार्यांच्या उत्पादन क्षमतेला बसला असला तरी पुढच्या वर्षी कोरोनापेक्षा सर्वाधिक फटका हा मानसिक आरोग्याला बसणार असून कर्मचाऱ्यांना मानसिक तणावाच्या समस्येला सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर पुढच्या वर्षात कोरोनाबरोबरच मलेरिया, डेंग्यू, इबोला आणि झिका यांसारख्या संसर्गजन्या आजारांचा परिणामही कर्मचार्यांच्या कामावर होण्याची शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.
संसर्गजन्य आजारांचा 91 टक्के परिणाम कर्मचार्यांच्या कामाकाजावर होणार असल्याचे मत सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी मांडले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा घरगुती कर्मचारी (85 टक्के), सहाय्यक (81 टक्के), विद्यार्थी आणि शिक्षक (80 टक्के) कामगार आणि व्यवसाय प्रवासी (79 टक्के) यांना बसणार असल्याचे सर्व्हेक्षणात म्हटले आहे.
इंटरनॅशनल एसओएसने घेतलेल्या ऑनलाईन मुलाखतीमध्ये निम्म्यांपेक्षा जास्त व्यक्तींनी आरोग्य आणि नोकरीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. पुढच्या वर्षात या दोन चिंता सर्वाधिक भेडसावणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे कर्मचार्यांना भेडसावणार्या मानसिक तणावाच्या परिणामाचा सामना करण्यासाठी कंपन्यांना पुरेशा संसाधनाची आवश्यकता लागणार आहे. तसेच 9/11 च्या हल्ल्यानंतर कर्मचार्यांची काळजी घेण्याची जबाबदारी कंपन्यावर आली होती. त्याचप्रमाणे यावेळीही कर्मचाऱ्यांच्यामध्ये आरोग्यासंबंधीच्या धोक्याची शक्यता वाढण्याची जास्त आहे.
कोविडमुळे जगभरात सार्वजनिक आरोग्य, भौगोलिक आणि आर्थिक संकटांमुळे त्रिपक्षीय संकट निर्माण झाले आहे. या सर्वाचा परिणाम जागतिक स्तरावर कामगारांवर आणि व्यवसायावर झाला आहे. कर्मचार्यांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे कर्मचार्यांनी त्यांच्या नोकरीची सुरक्षा आणि आरोग्य याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. यावेळी कर्मचार्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे हे केवळ उद्दिष्ट आहे.
डॉ. राहुल कालिया, वैद्यकीय संचालक, आंतरराष्ट्रीय एसओएस
---------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Corona and lockdown worker under mental stress increased
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.