नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या साप्ताहिक अहवालात ९ राज्यांतील ३६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे नमूद केले आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. या जिल्ह्यांचा कोरोना संसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला.
केरळमध्ये १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. या जिल्ह्यांचा कोरोना संसर्गदर १४ ते ३१.६४ टक्के नोंदवण्यात आला आहे. तर, मिझोराममधील ८ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गदर अधिक नोंदविण्यात आला आहे. या राज्यात सात जिल्ह्यांमध्ये संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे.तर, एका जिल्ह्याचा कोरोना संसर्गदर ६.८७ टक्के नोंदवण्यात आला आहे. १३ ते १९ एप्रिलदरम्यानच्या या अहवालानुसार मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी २ तसेच अरुणाचलमधील एका जिल्ह्यातील कोरोनास्थिती चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे.
राजधानी दिल्लीत देखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यातील दक्षिण (७.८२टक्के) , पश्चिम (६.३० टक्के;), दक्षिण-पश्चिम (५.७८ टक्के), उत्तर-पश्चिम (५.७५ टक्के) आणि पूर्व दिल्लीचा कोरोना संसर्गदर ५.३६ टक्के नोंदवण्यात आला आहे. रा हिमाचलमधील किन्नोर जिल्ह्यांचा संसर्गदर ६.८२ टक्के नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात १३ हजार ४३३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णांचा बरे होण्याचा दर ९८.७६ टक्के आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.