असा असेल अभिनंदन यांचा परतीचा प्रवास

abhinandan
abhinandan

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी  विंग कमांडर अभिनंदन यांची आज सूटका करणार असल्याचे काल (गुरुवारी) सांगितले. त्यांच्या सूटकेची वेळ निश्चित नसली तरी, वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारतात आणलं जाईल. 'बीटिंग द रिट्रीट'च्या वेळी अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केले जाण्याची शक्यता आहे. मात्र अभिनंदन यांना दुपारपर्यंत भारतात आणले जावे अशी मागणी भारताने केली आहे. 

विंग कमांडर अभिनंदन हे सध्या इस्लामाबादमध्ये आहेत. त्यांना आज विमानाने लाहोरला आणले जाईल. त्यानंतर वाघा बॉर्डरमार्गे भारताकडे सुपूर्द करण्यात येईल. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअरबेसला आणले जाईल. तिथून ते दिल्लीला रवाना होतील.

भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानाला पिटाळून लावण्यासाठी त्यांचा हवेतच पाठलाग करणारे एक मिग विमान पाकच्या हद्दीत कोसळले. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. त्यानंतर अभिनंदन पाकच्या ताब्यात आहेत. 

'बीटिंग द रिट्रीट' म्हणजे काय?
वाघा बॉर्डरवर रोज सायंकाळी दोन्ही देशाचे झेंडे उतरवले जातात. यावेळी दोन्ही देशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. त्यावेळी दोन्हीकडचे जवान अतिशय उत्साहात बॉर्डरपर्यंत मार्च करतात. मानवंदना देऊन आपले राष्ट्रध्वज खाली उतरवतात.

रिट्रिट म्हणजे थांबा/मागे फिरा. रिट्रिट हा युद्धातला शब्द आहे. युद्धाच्या काळात सूर्यास्तावेळी आपल्या सैनिकांना युद्ध थांबवण्यासाठी दिला जाणारा संकेत म्हणजे रिट्रिट. बिगुल वाजवून हा संकेत दिला जात असे. पण कालांतराने त्यात बदल होते गेले. जसे ड्रम्स आणि बिगुल वाजवून संकेत दिले गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com