हल्ल्यानंतर सीआरपीएफकडून धक्कादायक माहिती, गृहमंत्रालयाकडे पाठवला अहवाल

हल्ल्यानंतर सीआरपीएफकडून धक्कादायक माहिती, गृहमंत्रालयाकडे पाठवला अहवाल

नवी दिल्ली- जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या हल्ल्याचा अहवाल हा सीआरपीएफकडून गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं स्थानिक मदतीशिवाय शहरात आणणं दहशतवाद्यांना शक्य नाही असा खुलासा सीआरपीएफच्या अहवाला मांडण्यात आला आहे. 'गेल्या 15 दिवसांमध्ये 3 वेळा सीआरपीएफचा ताफा हलवला' असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

ज्यापद्धतीने हा हल्ला झाला त्याप्रमाणे या सगळ्याला स्थानिकांची मदत आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच दहशतवाद्यांकडून अशा प्रकारे 'वाहनांवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे' असे या अहवालात मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने लगेचच पाऊलं उचलावी असंही या अहवालात लिहण्यात आलं आहे. 

स्थानिकांच्या मदतीने हल्ले घडवण्यात येत असल्याचे या अहवालात सीआरपीएफकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कारण; एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांची ने-आण करण्यासाठी काश्मीरमध्ये परवाणगी नाही आहे. गाड्यांची अदला-बदल, स्फोटकांचा एवढा साठा यासाठी स्थानिक पातळीवर परवाना लागतो. तो कसा देण्यात आला असाही संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com