'दिल्लीत गांधी जयंतीच्या दिवशीच हिंसेच्या मार्गाचा वापर'

Delhi Farmers Kisan Kranti Morcha Stopped Police
Delhi Farmers Kisan Kranti Morcha Stopped Police

नवी दिल्ली- मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या वेशीवर धडकला. शेतकऱ्यांच्या किसान यात्रेला दिल्लीत येऊ देणार नाही, अशी भूमिका दिल्ली पोलिसांनी आधीच स्पष्ट केली होती. त्यानुसार दिल्लीच्या वेशीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांबरोबर आरपीएफ, पॅलामिलीटरी फोर्ससुद्धा तैनात दिल्लीत तैनात करण्यात आली होती.

मोर्चा रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मोर्चेकरी येताच पोलिसांनी त्यांना रोखले. जमाव आक्रमक असल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. शेतकऱ्यांवर पाण्याचा माराही करण्यात आला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, आज अहिंसेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधी आणि 'जय जवान, जस किसान' असा नारा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. याच दिवसी शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. शेतकरी नेते व विविध राजकीय पक्षांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे.  शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. यातून मोदी सरकारचा वाईट चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी प्रतिक्रिया या मोर्चात सहभागी झालेले शेतकरी देत आहेत. शेतकऱ्यांनी अहिंसेचा मार्गाचा अवलंब करावा, पोलिसांनी बळाचा वापर केला तरी लढा देत राहा, असे आवाहन शेतकरी नेते यावेळी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com