गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यू, मलेरिया आणि इतर सर्वच पावसाळी आजारांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
नवी दिल्ली : सध्या डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यू, मलेरिया आणि इतर सर्वच पावसाळी आजारांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) मंगळवारी डेंग्यूचा (Dengue) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तज्ज्ञांची पथके नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवली आहेत.
हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने हे पाऊल उचलण्यात आलंय. याबाबत आरोग्य सेवा महासंचालकांसह राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना (आरोग्य) पत्र पाठवण्यात आलंय. डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देऊन राज्य सरकारला मदत करण्यासाठी केंद्रीय पथकं तैनात करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतलाय, असं पत्रात म्हटलंय.
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांकडून डेंग्यूची जास्त प्रकरणं असलेल्या राज्यांची माहिती मागवली होती. आरोग्यमंत्र्यांनी या आजारावर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेतला. या वर्षी आतापर्यंत दिल्लीत डेंग्यूचे 1,530 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली गेली, जी गेल्या चार वर्षांतील या महिन्यातील सर्वाधिक संख्या आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.