‘ठेवींचे विमा संरक्षण वाढविणार’ - निर्मला सीतारामन

nirmala-sitharaman
nirmala-sitharaman

नवी दिल्ली - केंद्र सरकार ठेवींवरील विमा संरक्षणाची मर्यादा १ लाख रुपयांपेक्षा अधिक करण्यासाठी संसदेत कायदा आणेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यहाराच्या पार्श्‍वभूमीवर हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. अधिवेशनात मंजुरी मिळाल्यास ‘पीएमसी’ आणि त्यासारख्या इतर बॅंकांमध्ये ठेवी अडकलेल्या त्रस्त खातेदारांना आणि अडचणींचा सामना करत असलेल्या लाखो ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. 

सध्या व्यक्तिगत खातेदारांसाठी ठेव विम्याची मर्यादा १ लाख रुपये आहे. ठेव विम्याच्या मर्यादेत १९९३ मध्ये वाढ करण्यात आली होती. त्या वेळी ती ३० हजारांवरून एक लाख रुपये करण्यात आली. मात्र, २६ वर्षांत ठेवींवरील विमा संरक्षणाच्या मर्यादेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 

‘पीएमसी’ बॅंकेतील ४ हजार ३५५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर विमा संरक्षणाची सध्याच्या एक लाख रुपयांची मर्यादा वाढविण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com