अहमदाबाद - एखाद्या कंपनीत नोकरी करत असताना जर राजीनामा दिल्यानंतर ठराविक कालावधी काम करावं लागतं. हा नोटीस पिरियड पूर्ण न करता नोकरी सोडल्यास आता कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगने नोटिस पिरियड पूर्ण न करता नोकरी सोडल्यास 18 टक्के जीएसटी आकारण्यात येईल असं सांगितलं आहे
नोकरी सोडताना प्रत्येक कंपनीमध्ये ठराविक काळाचा नोटीस पिरियड असतो. तो कालावधी 1 ते 3 महिन्यापर्यंतचा असू शकतो. आता नोकरी अचानक सोडल्यास कंपनीच्या नियमांव्यतिरिक्त आणखी आर्थिक फटका बसू शकतो. जर नोटीस पिरियडचा कालावधी जास्त असेल तर कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या वेतनाइतकंही पैसे द्यावे लागू शकतात.
गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगने हा निर्णय घेतला आहे. नोटीस पिरियड पूर्ण न केल्यास हा दंड भरावा लागणार आहे. कर्मचारी अचानक नोकरी सोडून गेल्यानं कंपनीचं नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.