Atal Bihari Vajpayee : वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत : पंतप्रधान

End of a era by the death of Vajpayee says PM Modi
End of a era by the death of Vajpayee says PM Modi

नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा अंत झाला. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन कायम आमच्यासोबत राहील. प्रत्येक भारतीयाला आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळत राहील. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्यासाठी देव त्यांना शक्ती देवो, ओम शांती", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी वाजपेयींच्या कवितेच्या माध्यमातून ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. ''मी नि:शब्द आहे, शून्यात आहे. मात्र, भावनांचा ज्वर उमटत आहे. आमच्यासोबत अटलबिहारी वाजपेयी नाहीत. त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित केला होता. त्यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत आहे'', असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com