सहा महिन्यांसाठी संपूर्ण नागालॅंड "अशांत' 

सहा महिन्यांसाठी संपूर्ण नागालॅंड "अशांत' 

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत. 

संपूर्ण नागालॅंडमधील परिस्थिती अशांत आणि धोकादायक बनली असल्याने येथे नागरी प्रशासनाच्या जोडीला लष्कराचे बळ वापरणे आवश्‍यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे, असे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण नागालॅंड राज्य अशांत घोषित करण्यात येत असून, पुढील सहा महिने "अफ्स्पा' कायदा राज्यभर लागू असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

नागालॅंडमध्ये अनेक दशकांपासून हा कायदा अमलात असून, राज्यातील परिस्थिती पाहता या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com