पुणे : ''प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे. पण संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा'', असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी व्यक्त केली. देशात इच्छामरणाचा मुद्दा उपस्थित होत असताना मिश्रा यांचे मत महत्वपूर्ण मानले जात आहे.
'बॅलन्सिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनल राइट्स’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश मिश्रा बोलत होते. ते म्हणाले, ''एखाद्या व्यक्तीला दुर्धर आजाराने ग्रासले असेल. त्या व्यक्तीला इच्छामरण हवे असेल तर संबंधित व्यक्ती इच्छामरणाचे मृत्यूपत्र तयार करू शकते. अंतिम श्वास केव्हा घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, असे करताना संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा. कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती आत्महत्या करु शकत नाही. मात्र, प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे'', असेही मिश्रा म्हणाले.
दरम्यान, मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीला इच्छामरणाच्या मृत्यूपत्राबाबत मार्गदर्शकतत्त्व देत संबंधित व्यक्तीला अखेरचा श्वास केव्हा घ्यायचा याचा अधिकार असेल, असे सांगितले होते. त्यानंतर आता याबाबत सरन्यायाधीशांनी महत्वपूर्ण मत मांडले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.