युती सरकारचा मीच संकटमोचक - सिद्धरामय्या

युती सरकारचा मीच संकटमोचक - सिद्धरामय्या

बंगळूर - राज्यातील युती सरकारचा मीच संकटमोचक असल्याने मला समन्वय समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. ते रविवारी (ता.३०) म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलत होते. 

सिद्धरामय्या म्हणाले, ‘युती सरकार अडचणीत येऊ नये, हे पाहण्यासाठी मला समन्वय समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. काँग्रेस-धजद युती सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे केवळ प्रसारमाध्यमातील वृत्त असून कोणत्याच आमदारांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केलेला नाही. राज्यातील युती सरकारबाबत चांगला अभिप्राय आहे. कर्जमाफीबाबत जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. युती सरकार पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करील. सरकारला कोणताही 
धोका नाही.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com