दिल्लीत शेतकरी मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा मृत्यू

Farmer of Kolhapur Died after collapse from Building Delhi
Farmer of Kolhapur Died after collapse from Building Delhi

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकरी संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सध्या केला जात आहे.

करण संत असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. करण संत हे शेतकरी मोर्चासाठी कोल्हापूरहून दिल्लीत आले होते. मात्र, पहाडजंग येथील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. या मोर्चासाठी खासदार राजू शेट्टीही काल (शुक्रवार) सहभागी झाले होते. करण संत हे तिसऱ्या मजल्यावरुन खाली कसे कसे पडले, याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक तपास करत आहेत, असे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अमित शर्मा यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com