नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन संपवण्याची घोषणा लवकरच होऊ शकते. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारसोबतची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. यासंबंधी आज सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांची बैठक होणार आहे.
सरकार एमएसपी हमी कायद्यावर समिती स्थापन करणार आहे. आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाही सरकारने दिल्याचे समजते. आज आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी सरकारने तडजोडीसाठी जे पत्र पाठविले होते. त्यात शेतकऱ्यांनी सुधारणा सुचविल्या होत्या. त्यावर आधी चर्चा होईल.
सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी चर्चा करत आहेत. शेतकरी परतीच्या आंदोलनाबाबत निर्णय घेऊ शकतात. एमएसपीवर कायदेशीर हमीभाव, शेतकऱ्यांवरील खटले परत करावेत, शेतकरी आंदोलनात बळी गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांवर शेतकरी लेखी हमी मागत होते. सरकारने ती देण्याची तयारी केली आहे.
सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यात स्वत: मध्यस्थी करीत आहेत. एमएसपी हमीभावासह त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन स्थगित करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंजाब आणि दिल्लीच्या सीमेवर सुमारे 15 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.