महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त शेतकऱ्यांचे उपोषण, साजरा करणार सद्भावना दिवस

Farm_Laws1
Farm_Laws1

नवी दिल्ली- 26 जानेवारीला शेतकरी आणि पोलिसांमधील झालेल्या संघर्षानंतर संयुक्त किसान मोर्चाने 30 जानेवारीला संपूर्ण देशात सद्भावना दिवस म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आलंय की, दिल्लीसह देशभरात जेथे-जेथे कृषी कायद्यांविरोधात निदर्शने करत आहेत, तेथे 30 जानेवारीला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपोषण करण्यात येईल. संयुक्त किसान मोर्चाने सर्व देशवासियांना एकदिवसीय उपवास करण्याचे आवाहन केले आहे. 

सुनियोजित होता 26 जानेवाराचा कट

संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आलंय की, 26 जानेवारीचे षडयंत्र भाजपच्या लोकांकडून सुनियोजित होता. त्यांच्याकडून शेतकरी आंदोलनाला बदनाम केलं जात आहे. 99 टक्के शेतकऱ्यांनी पोलिसांनी निर्धारित केलेल्या रुटवरुन मोर्चा काढला. पण, भाजपच्या लोकांनी दुसऱ्या मार्गाने जाऊन उत्पात माजवला. त्यासोबत आमचं काही देणं-घेणं नाही.  

संयुक्त किसान मोर्चाचे डॉ. दर्शनपाल सिंग यांनी गाजीपूर बॉर्डरवर ठाण मांडून असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन करत असताना मोठ्या हिंमतीने सरकारचा सामना केला आहे. भाजप आणि आरएसएसचे लोक आंदोलन तोडण्याचे आणि शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे 26 जानेवारीची हिंसा सुनियोजित होती. यासाठी भाजपचे कार्यकर्ते पूर्णपणे जबाबदार आहेत, असं ते म्हणाले आहेत. 

धुडगूस घालणाऱ्यांना का रोखले नाही? : राहुल गांधी

तिरंग्याचा सन्मान आम्हाला करता येतो

भाजपने शेतकऱ्यांवर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप लावला आहे. पण, त्यांना माहिती नाही की तिरंग्याचा सर्वाधिक सन्मान आम्हीच करतो. शेतकऱ्यांची मुलेच तिरंग्यामध्ये लपेटून येतात, ज्याला आम्ही छातीला लावून संपूर्ण आयुष्य आठवण काढतो, असं डॉ. दर्शनपाल सिंग म्हणाले. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेनंतर शेतकरी नेत्यांवर केंद्र सरकारने दबाव वाढवला आहे. हे आंदोलन लवकरात लवकर गुंडाळलं जावं, म्हणून सरकार हरतर्हेने प्रयत्न करताना दिसत आहे. गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना आंदोलन स्थळ रिकामं करण्यासाठी नोटीस देखील प्रशासनाकडून बजावण्यात आली होती. मात्र, काहीही झालं तरी आम्ही इथून हटणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी दाखवून दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com