ऊसाच्या थकीत बिलासाठी बेळगावात शेतकऱ्यांचे आंदोलन

ऊसाच्या थकीत बिलासाठी बेळगावात शेतकऱ्यांचे आंदोलन

बेळगाव - थकीत ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. प्रतिबंधात्मक गुन्ह्याखाली पोलिसांनी कारवाई केली. कर्नाटक राज्य रयत संघटनेने पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविला.

कारखान्यांची थकीत बिले मिळत नाहीत. पाठपुरावा करणाऱ्यांची मुस्कटबादी सुरु आहे. शेतकऱ्यांवर दडपशाही सुरु आहे, अशा शब्दात टीका केली. 

मंत्री, नेत्यांच्या ताब्यात साखर कारखाने आहेत. नेत्यांकडूनच 2016-17 वर्षातील ऊस बिले थकीत आहेत. शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यानंतरही बिले अदा केली नाही. थकीत बिले अदा करा, अन्यथा 11 सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरु करु, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. पण, मुदतीत बिले मिळाली नाहीत. यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज (ता.14) जमले. प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरु केले. याठिकाणी मार्केट पोलिस दाखल झाले. आंदोलनाला मज्जाव असल्याचे सांगितले. यावर शेतकऱ्यांनी आंदोलन पूर्वनियोजित आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाला कल्पना दिल्याचे सांगितले. 

राष्ट्रपतींसह विविध महनीय व्यक्तींचे उद्या (ता.15) बेळगावामध्ये येत आहेत. त्यानिमित्त पूर्वतयारी सुरु आहे. वाहतुकीला शिस्तसह कायदा आणि सुवस्था राखण्यासाठी नियोजन आहे. प्रतिबंधात्मक गुन्हाखाली कारवाई सुरु आहे. त्यानुसार आंदोलन मागे घ्यावे, अशी माहिती दिली. मात्र, आंदोलक शेतकरी आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. आंदोलन करण्यावर ठाम राहिले. यामुळे अखेर 50पेक्षा अधिक 
शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.

पोलिस वाहनांतून एपीएमसी पोलिस ठाण्याकडे नेऊन सोडण्यात आले. दरम्यान, आंदोलकांना ताब्यात घेत असताना शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. यामुळे शेतकरी आणि पोलिस यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. पोलिसांतर्फे व्यापक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com