नवी दिल्ली : केंद्र सरकारद्वारे कृषी कायदे रद्द केले गेल्यानंतर आता सिंघू बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर आंदोलनाचं भविष्य ठरवण्यासाठीची बैठक सात डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, सरकारशी चर्चा करण्यासाठी पाच सदस्यीय कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये बलवीर सिंह राजोवाल, युद्धवीर सिंह, शिव कुमार शर्मा, गुरनाम सिंह चढूनी, अशोक ढवळे यांचा समावेश आहे. मात्र, या कमिटीमध्ये राकेस टीकैत यांचा समावेश नाहीये.
एमएसपीशिवाय आहेत अनेक मुद्दे
या बैठकीआधी शेतकरी नेते दर्शन पाल यांनी म्हटलं होतं की, अद्याप तरी हे पाहायला हवं की, केंद्र सरकार जी समिती बनवणार आहे, तिच्याकडे काय अधिकार असतील? चर्चेचा मसुदा काय असेल? सध्या तरी आम्ही केंद्र सरकारची भूमिका काय आहे, ते पाहत आहोत. संयुक्त किसान मोर्चाचं म्हणणं आहे की, कृषी विधेयकावर समग्र पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, ज्यात दोन्ही पक्षांच्याही हिताचं संरक्षण होईल. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, एमएसपी त्यांच्यासाठी मोठा मुद्दा आहे. मात्र, त्याशिवाय आणखीही काही मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा होणे बाकी आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
पुढची बैठक सात तारखेला होईल.
एमएसपीवर चर्चा करण्यासाठी पाच सदस्यीय कमिटीची स्थापना
या कमिटीमध्ये राकेश टिकैत यांचा समावेश नाही.
सरकारने एमएसपी कमिटीशी दोन दिवसांत चर्चा करावी
आंदोलनाबाबतचा निर्णय पुढच्या बैठकीत
चर्चेसंदर्भात संघटनांमध्ये मतमतांतरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.