डाळींबाबत देश आत्मनिर्भर नव्हे तर आयातनिर्भर होण्याची भीती

खाद्यतेलाप्रमाणे डाळींच्या आयातीबाबत घेतलेला निर्णय खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी अनिष्ट तर ठरेलच पण त्यातून डाळींबाबतही देश आत्मनिर्भर नव्हे तर आयातनिर्भर होण्याची भीती आहे.
Dal
DalSakal

नवी दिल्ली - डाळींच्या (Dal) आयातीला (Import) परवानगी देण्याच्या केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Government) निर्णयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) भारतीय किसान संघाने आक्षेप घेतला. खतांच्या दरवाढीवरही (Rate) टीका करताना ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली. (Fear India Dal becoming Self Reliant Import dependent)

खाद्यतेलाप्रमाणे डाळींच्या आयातीबाबत घेतलेला निर्णय खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी अनिष्ट तर ठरेलच पण त्यातून डाळींबाबतही देश आत्मनिर्भर नव्हे तर आयातनिर्भर होण्याची भीती आहे, असा टोला लगावला आहे.

Dal
Video: पोलिसांची दादागिरी; मास्क न घातल्याने महिलेला मुलीसमोरच चोपलं

सरकारच्या धोरणांवर संघ परिवारातील संस्थेने टीकास्त्र सोडले आहे. केंद्राने तूर, मूग आणि उडीद याची आयात खुली केली. हा निर्णय घातक ठरेल, असे किसान संघाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या किसान क्रेडिट कार्डधारक शेतकऱ्यांना कर्ज माफ करावे, अशी मागणी किसान संघाने केली आहे. किसान क्रेडिट कार्डांची नूतनीकरण मर्यादा ३० जूनपर्यंत वाढवली असली तरी जे हजारो शेतकरी कोरोना महामारी मृत्युमुखी पडले त्यांच्या कर्जावर केंद्राने कृषी कर्जमाफीचा उपाय करावा अशीही मागणी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com