आसामला महापुराचा तडाखा; पावसामुळे ब्रह्मा नदीने ओलांडली धोक्‍याची पातळी 

assam-flood
assam-flood

गुवाहटी - कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आसामला आता महापुराचा सामना करावा लागत आहे. एकाच वेळी आलेल्या या दोन संकटांमुळे राज्याला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. आतापर्यंत राज्यातील पाच जिल्ह्यांतील 30 हजार नागरिकांना महापुराचा तडाखा बसला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात 1 मेपासून पाऊस पडत असल्याने ब्रह्मा नदीला पूर आलेला आहे. दिवसेंदिवस नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. पावसाचे प्रमाणही वाढत आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाच्या अधिकारी एस. सी. कलिता यांनी दिली. 

त्यांनी सांगितले, की पावसामुळे 16 मेपासून ब्रह्मा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. प्रत्येक दोन ते तीन तासांना पाण्याची पातळी 1 ते 2 सेंटिमीटरने वाढत आहे. सध्या पाण्याची पातळी 45.80 मीटर एवढी आहे.' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आसामच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ब्रह्मा नदीला मिळणारी जिया भराली नदी 22 मेपासून धोक्‍याच्या पातळीवर वाहत आहे. आधीच कोरोनाचा वाढता धोका आणि आता महापुरामुळे आसामला एकाच वेळी दोन संकटांना तोंड द्यावे लागत आहे. आतापर्यंत ढेमाजी, दिब्रुगड, दरंग, लखीमपूर, गोलपारा या जिल्ह्यांतील सुमारे 30 हजार 700 नागरिकांना या महापुराचा तडाखा बसला आहे. गोलपारा जिल्ह्यातील सुमारे 9 हजार नागरिकांचे सोमवारी पुनर्वसन करण्यात आले. पाच जिल्ह्यांतील सुमारे 127 गावे आतापर्यंत बाधित झाली आहेत. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे सुमारे 400 जवान या संकटाशी दोन हात करून नागरिकांना मदत करत आहेत. 33 ठिकाणी मदत छावण्यात लावण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, आसाममध्ये सोमवारी 187 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 539 झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com