भारताचे सैन्य अजूनही हाय अलर्टवर; भारताची पाणबुडी सज्ज

INS Kalavari
INS Kalavari

नवी दिल्ली : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले असले तरी दोन्ही देशांमधील तणाव अद्याप कमी झालेला नाही. भारताची सुरक्षा यंत्रणा सज्ज असून, सीमेनजीक अरबी समुद्रात पाणबुडी अजूनही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे.

भारतमातेचे वायुसेनानी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मातृभूमीवर पाऊल ठेवले अन्‌ देशात एकच जल्लोष झाला. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन यांची सुटका केली असली तरी अद्याप दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकमध्ये घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले होते. पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत विमाने घुसविली होती. भारताने पाकचे एक विमान पाडल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आम्ही सज्ज असल्याचे म्हटले होते.

भारताने आपली तयारी कायम ठेवली असून, भारताची ताकद असलेली आयएनएस कलावरी ही पाणबुडी सज्ज ठेवली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवर जम्मू सेक्टरमध्ये जवानांना तैनात ठेवले आहे. अभिनंदन भारतात परतल्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांनी आम्ही कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com