मोदी सगळ्याच बाबतीत 'फेल'; मनमोहनसिंगांचे टीकास्त्र

manmohan singh
manmohan singh

नवी दिल्ली : 'मोदी सरकार हे सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे,' असे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. आर्थिक, कृषी व शेजारील राष्ट्रांशी संबंध टिकवण्यात मोदी सरकार कमी पडले आहे. तसेच त्यांनी केलेल्या विकासकामानेही नागरिक प्रभावित झालेले दिसत नाहीत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपील सिब्बल यांच्या 'शेड्स ऑफ ट्रुथ' या पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते. 'सरकारला शेतकऱ्यांचे संकट दूर करता आले नाही, तसेच हमीभावाबाबत शेतकरी अजूनही साशंक आहेत,' असेही यावेळी सिंग यांनी सांगितले. सिब्बल यांनी पुस्तकात मोदी सरकारच्या चार वर्षातील कामांचे विश्लेषण केले आहे. 2014 मध्ये केलेल्या कोणत्याच आश्वासनांची पूर्ती केलेली नाही, त्यावर हे पुस्तक भाष्य करते.

मोदींनी 2014 मध्ये आश्वासन दिले होते की, देशातील तरूणांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या मिळतील, पण भाजप सत्तेत आल्यापासून रोजगार वाढीचे प्रमाण कमी झाले आहे, अशी टीका सिंग यांनी केली.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com