सरकारने आदिवासींच्या जमिनी लाटल्या : राहुल गांधी

सरकारने आदिवासींच्या जमिनी लाटल्या : राहुल गांधी

भवानी पाटणा (ओडिशा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे आदिवासींच्या जमिनी बळकावत असून, कॉंग्रेस पक्ष त्यांच्या अधिकारासाठी लढत राहील, असे आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. भवानी पाटणा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 

राहुल म्हणाले, केंद्रातील भाजप आघाडी सरकार आणि राज्यातील बीजूद सरकार हे आदिवासी, शेतकरी आणि गरिबांसाठी कल्याणकारी काम करण्यास अपयशी ठरले आहे. आदिवासींच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याचे काम केवळ कॉंग्रेस पक्षच करू शकतो. ओडिशात आणि ओडिशाबाहेर आदिवासींचे हक्क सुरक्षित ठेवू, असे राहुल म्हणाले. भाजप आणि बीजूद सरकार उद्योगपती मित्रांसाठी काम करत असून, गरीब आणि शेतकरी वर्गाकडे या सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे ते म्हणाले.

मोदी सरकारने 15 उद्योगपतींचे 3.5 लाख कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, असाही आरोप केला. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यास ओडिशी सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार येताच दोन दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे राहुल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com