निर्मला सीतारमन म्हणतात, 'सरकार अर्थव्यवस्था नीट हाताळतेय'

निर्मला सीतारमन म्हणतात, 'सरकार अर्थव्यवस्था नीट हाताळतेय'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था कमकुवत बनली असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यानंतर आता यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकावरच निशाणा साधला. त्या म्हणाल्या, सरकार चांगल्या पद्धतीने अर्थव्यवस्था हाताळत आहे. मात्र, अर्थव्यवस्थेत ज्या काही अडचणी येत आहेत, त्या मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळातील चुकांमुळे येत आहेत. 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडून अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता निर्मला सीतारमन यांनी वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. अर्थव्यवस्थेवरून राजकीय मूल्यांकन केले जात आहे. मात्र, हे कोणीही थांबवू शकत नाही. अर्थव्यवस्था कशी हाताळायची यावर आम्ही विचार करत आहोत. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे प्रयत्न करत आहे, असेही त्या म्हणाल्या. 

चुकीचे ते मनमोहनसिंग यांच्या काळातलं

अर्थव्यवस्थेतील अडचणींबाबत सीतारमन म्हणाल्या, जे काही चुकीचे घडले, ते आम्ही नव्याने सुरु करत आहोत. हे सगळं मनमोहनसिंग जेव्हा पंतप्रधान होते आणि रघुराम राजन जेव्हा आरबीआयचे गर्व्हनर होते तेव्हाची ही परिस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com