मोदी सरकारकडून 'हेडलाइन मॅनेजमेंट' : प्रियांका गांधी

मोदी सरकारकडून 'हेडलाइन मॅनेजमेंट' : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी पुन्हा एकदा देशाच्या आर्थिक स्थितीवरून सरकारवर निशाणा साधला आहे, देशामध्ये गुंतवणूकदारांच्या विश्‍वासाला तडा गेला असतानाही मोदी सरकार सत्य मान्य करायला तयार नसल्याचे मत गांधी यांनी मांडले आहे.

काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ देताना गांधी यांनी म्हटले आहे की, "मागील सहा वर्षांच्या कार्यकाळात परकी गुंतवणूकदारांनी भारतात 45 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक केली होती, मोदी देशामध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणतील, अशी अपेक्षा त्यांना होती; पण या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापकांनी जून महिन्यापासून 4.5 अब्ज डॉलरचे समभाग विकले आहेत.

सरकार दररोज पाच ट्रिलियनचा पुनरुच्चार करत, हेडलाइनचे व्यवस्थापन करत परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकत नाही. केवळ इव्हेंट स्पॉन्सर केल्याने कुठलाही उद्योगपती गुंतवणूक करत नसतो.''

गुंतवणूकदारांच्या आत्मविश्‍वासाला तडा गेला असून, देशाचा आर्थिक पायाही दुभंगला आहे, असेही प्रियांका यांनी हिंदीमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com