बलिया (उत्तर प्रदेश) : भगवान 'श्रीराम' सुद्धा वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखू शकले नसते, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. बुधवारी (ता.25) बलिया जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. सिंह एवढ्यावरच थांबले नाही तर हिंदूत्वाच्या अखंडतेसाठी प्रत्येक माता पित्याने किमान 5 मुलांना जन्म द्यावा. भारतातील हिंदूंची लोकसंख्या वाढवण्यासाठी ही पायरी आवश्यक असल्याचे बेताल वक्तव्यही सुरेंद्र सिंह यांनी केले.
या आधीही उत्तर प्रदेशातील बलिया येथे जे लोक 'भारत माता की जय' म्हणत नाहीत ते पाकिस्तानी आहे. शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा वेश्या अधिक चांगल्या आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीरामाचा अवतार आहेत. बलात्काराच्या घटनांसाठी मोबाईल कारणीभूत आहे. अशी अनेक वादग्रस्त विधाने भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी याआधी केली आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.