संसदेची माफी मागतो, एअर इंडियाची नाही- गायकवाड

Ravindra Gaikwad shiv Sena
Ravindra Gaikwad shiv Sena

नवी दिल्ली : गैरवर्तन करणारे मोकाट, आणि मलाच शिक्षा का दिली जात आहे. 'तू नरेंद्र मोदी है क्या' असे म्हणत अधिकाऱ्यानेच माझ्याशी अरेरावी केली असताना माझ्याच विरोधात गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला. माझ्याकडे शस्त्र नव्हते, तरी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कसा दाखल केला आहे, असा सवाल खासदार रवींद्र गायकवाड यांनी लोकसभेत उपस्थित केला. 

यासंदर्भात गायकवाड यांनी लोकसभेत निवेदन केले. संसदेच्या प्रतिमेला तडा गेला असल्यास मी संसदेची माफी मागतो. मात्र, मी एअर इंडियाची अधिकाऱ्याची माफी मागणार नाही असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. खासदार गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी विरोधात लोकसभेत शिवसेनेचे खासदार आक्रमक झाले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज 12.45 पर्यंत तहकूब करण्यात आले. आपल्यावरील बंदी उठविण्यात यावी, तसेच गुन्हा मागे घेण्यात यावा अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षा सुनीता महाजन व केंद्रीय गृहमंत्री रजनाथसिंह यांच्याकडे केली. 

तो म्हणाला, 'तू नरेंद्र मोदी है क्या'
निवेदनात गायकवाड यांनी सांगितले की, मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार वही मागितली होती. तो अधिकारी ४५ मिनिटांनंतर माझी तक्रार ऐकण्यासाठी आला. 
तो मला म्हणाला 'तुम कौन हो?' त्यावर मी त्याला विचारले 'तुम कौन हो?', तर तो म्हणाला, "मै एअर इंडिया का बाप हूँ।"

मी त्याला सांगितले की, मी खासदार आहे. त्यावर तो अधिकारी म्हणाला, "तो तू नरेंद्र मोदी है क्या?"

त्यावर मी त्या अधिकाऱ्याला ढकलून दिले. त्यावरून माझ्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विमानाने प्रवास करणे हा माझा घटनात्मक अधिकार आहे. एअरलाईन्स माझा अधिकार कसा काय नाकारू शकतात, असे गायकवाड म्हणाले.

लोकसभेत मला न्याय मिळेल अशी आशा, मी एक शिक्षक आहे, विनम्रता हा माझा स्वभाव आहे

केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गिते म्हणाले, "रवींद्र गायकवाड हे सन्माननीय संसद सदस्य आहेत. विमान प्रवास करीत असताना प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. परंतु, विमानात अशा काहीही घटना घडल्यास संबंधितांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जातो. हे अन्यायकारक आहे. त्यामध्ये बदल करण्यात यावा."

तसेच, विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, माझ्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर माझ्या नावाने सातवेळा विमानाची तिकिटे काढण्यात आली. त्या जागी कोणी प्रवास केला मला माहीत नाही. कोणीही कोणाच्याही नावे प्रवास करणे धोकादायक आहे. विमान प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची ओळखपत्रे तपासण्यात यावी. त्यासाठी कायदा केला जावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

त्या घटनेवेळी काय म्हणाले होते रवींद्र गायकवाड?

तडजोड करणार नाही- मंत्री 
त्यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी उत्तर देताना सांगितले की, विमान प्रवासात प्रवाशांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असून, त्यामध्ये तडजोड करणार नाही. हे प्रकरण मिटवायचे असेल तर आम्ही तसे करू शकतो. आणि ते वाढवायचे असेल तर तसेही करू शकतो असा इशारा त्यांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com