वायू चक्रीवादळाची तीव्रता वाढली; मुंबईसह कोकण किनारपट्टीवर अलर्ट

Vayu
Vayu

मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या वायू चक्रीवादळाची तीव्रता आज (बुधवार) वाढली असून, त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे वादळ गोव्याच्या समुद्रावरून पुढे सरकत असून त्याच्या वाऱ्याचा वेग प्रतितास १३५ ते १४० किलोमीटर आहे. हा वेग १५५ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर समुद्रात हे चक्रीवादळ आहे. त्यामुळे गोव्यासह कोकणकिनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार आहेत, तसेच जोरदार पाऊस पडणार असल्याने गोवा, मुंबईसह  संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जाहिर केल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

हे चक्रीवादळ गुरुवारी सकाळी गुजरातच्या पोरबंदरजवळ जमिनीला धडकणार आहे. त्यामुळे तेथे रेड अलर्ट देण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. गुजरात किनारपट्टीला "वायू' या चक्रीवादळाचा सर्वांत जास्त धोका आङे. या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीही किनारी भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com