दमदार पावसामुळे खरीप पेरणीत वाढ 

Crops.jpg
Crops.jpg

बेळगाव : दमदार पाउस झाल्याने जिल्ह्यातील यंदा कृषी क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी 91.9 टक्‍के पेरणी झाली होती. त्यामध्ये यंदा वाढ झाली असून 97.4 टक्‍के पेरणी झाली आहे. गतवर्षीपेक्षा 5.5 टक्‍के अधिक पेरणी झाली आहे. 

कृषी खात्याच्यावतीने जिल्ह्यात यंदा 6.79 लाख हेक्‍टरमध्ये पेरणीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले होते. त्यापैकी 6.61 लाख हेक्‍टरमध्ये पेरणीचे उद्दिष्ठ साध्य झाले आहे. तंबाखू आणि उस लागवडीच्या हालचाली सुरु आहेत. जिल्ह्यात 1.21 लाख हेक्‍टरध्ये तंबाखुची लागवड केली जाते. तंबाखु, उस आणि जोंधळ्याची पेरणी झाल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीचे उदिष्ठ साध्य होणार आहे.

समाधानकारक पावसामुळे पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी उद्दिष्ठांपेक्षा 152.9 हेक्‍टरमध्ये उडीद आणि हरभराची पेरणी झाली होती. यावर्षी 52 हेक्‍टर कमी पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे 22.1 हेक्‍टरमध्ये हरभराची पेरणी झाली होती. यंदा केवळ 18.1 हेक्‍टरमध्ये पेरणी झाली आहे. यावेळी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 6.61 लाख हेक्‍टरमध्ये पेरणी झाली होती. त्यामध्ये 1.99 लाख हेक्‍टरमध्ये भात, जोंधळा, मका व इतर धान्याची पेरणी करण्यात आली आहे.

2.69 लाख हेक्‍टरमध्ये तुरडाळ, हरभरा, उडीदची पेरणी करण्यात आली आहे. 1.20 लाख हेक्‍टरमध्ये शेंगा, सुर्यफुलसह इतर तेलबियांची पेरणी करण्यात आली आहे. 2.71 लाख हेक्‍टरमध्ये उस, तंबाखू आणि कापुर अशा व्यापारी पिकांची लागवड करण्यात आली आहे. 
 
''गतवषीं 91.9 टक्‍के पेरण्या झाल्या होत्या. यापर्वी चांगल्या पावसामुळे हे प्रमाण वाढुन 97.4 टक्‍के झाले आहे. उस तंबाखु आणि मका या सारखा व्यापारी पिकांची पेरणी अद्याप सुरुच आहे सप्टेंबर अखेर पेरणीचे उद्दीष्ठ पुर्ण होईल.''
- जिलाणी मोकाशी, सहसंचालक कृषी खाते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com