...तर काश्मीरमध्ये अशी परिस्थिती उद्भवली नसती : माजी रॉ प्रमुख

 ...तर काश्मीरमध्ये अशी परिस्थिती उद्भवली नसती : माजी रॉ प्रमुख

नवी दिल्ली: आपल्याला काश्मीरमधील लोकांशी चर्चा करण्याची गरज आहे. पाकिस्तानसोबतही बोलायला हवे. चर्चेशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. एकवेळ अशी होती की, मनमोहन सिंग सरकार समझोत्यापासून एक पाऊल दूर होते. जर तो समझोता झाला असता तर काश्मीरमध्ये अशी परिस्थिती उद्भवली नसती, असे गुप्तचर संस्था (रॉ)चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी दुलत यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, मनमोहन सिंग आणि मुशर्रफ यांच्यात होणारा करार होता होता राहिला होता.

दुलत पुढे म्हणाले की, पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवाद्यानी दिलेली भेट असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दुलत यांच्या मते, दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने निवडणुकीच्या आधी भाजपला भेट म्हणून पुलवामा हल्ला केला. त्यांनी असंही म्हटलं की, पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेला एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकची कारवाई योग्य होती. दुलत इंडियन इकॉनॉनिक ट्रेड ऑर्गनायझेशन 2019 च्या कार्यक्रमानंतर बोलत होते.

दुलत यांनी म्हटले की, याआधीही मी याबद्दल बोललो आहे. जैशने भाजप, मोदी यांना एक भेटच दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या हल्ल्याची भीती होती आणि ती खरी ठरली. त्यानंतर पाकिस्तानात घुसून कारवाई करणं योग्य होतं. दुलत यांनी फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा हवाला देत म्हटले की, आपण पूर्वग्रह सोडले पाहिजेत. नाहीतर कट्टर राष्ट्रवाद वाढेल आणि याचा परिणाम युद्धच असेल. दुलत यांनी न्यूझीलंडमधील हल्ल्यानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांच्या प्रतिक्रियेचं कौतुक केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com