Indian Air Strike : बालाकोटमध्ये घुसलो.. सहा मिनिटांत इस्लामाबादही गेलं असतं..!

Indian Air Strike : बालाकोटमध्ये घुसलो.. सहा मिनिटांत इस्लामाबादही गेलं असतं..!

नवी दिल्ली : सतत कुरापती काढणार्‍या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने आज (मंगळवार) जोरदार दणका दिला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलाने बॉम्बहल्ला करून 'जैश ए महंमद'चे प्रशिक्षण तळ उध्वस्त केले. पण एवढ्यापुरता हा हल्ला मर्यादित नाही. भारताने पाकिस्तानला दिलेला इशारा याहीपेक्षा मोठा आहे. याचे कारण, जिथे हल्ला झाला तिथपर्यंत भारतीय हवाई दल विनासायास पोचलेच; शिवाय तेथून इस्लामाबाद आणि लाहोरलाही भारताने मजल मारली आहे.

बालाकोट हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. तिथून इस्लामाबाद १९६ किलोमीटरवर आहे. बालाकोटहून अबोटाबाद तर फक्त ६२ किलोमीटरवर आहे. बालाकोटहून लाहोर ४४८ किलोमीटरवर आहे. या हल्ल्यासाठी भारतीय हवाई दलाने 'मिराज' या विमानांचा वापर केला होता. दोन हजारांहून अधिक किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने जाणार्‍या या विमानांना बालाकोटहून लाहोर किंवा इस्लामाबादला जाण्यासाठी काही मिनिटेही पुरली असती.

शिवाय, अबोटाबादमध्येही भारतीय हवाई दलाची विमाने दिसल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. अबोटाबाद हा पाकिस्तानचा एक मोठा लष्करी तळ आहे. तिथपर्यंत घुसून भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली आहे. 

एका अंदाजानुसार, 'मिराज' विमानांनी अवघ्या सहा मिनिटांत इस्लामाबाद गाठले असते. त्यामुळे हवाई दलाने मारलेल्या या धडकेमुळे पाकिस्तानला नक्कीच मोठा धक्का बसला आहे. थेट राजधानीपर्यंत भारताची विमाने येऊ शकत असल्याचे उघड झाल्याने त्यांच्या संरक्षण यंत्रणेतील त्रुटीही उघड झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com