नवी दिल्ली: भारतीय अधिकाऱ्यांनी कुठलाही गाजावाजा न करता दोहामध्ये तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेतली, असा दावा कतारच्या विशेष दूताने केला आहे. मागच्या काही काळात तालिबान (Taliban) बरोबर चर्चा झाल्याचे संकेत भारतातील सूत्रांनी दिले आहेत. "अफगाणिस्तावर (afganistan) तालिबान पुन्हा वर्चस्व मिळवेल म्हणून भारत त्यांच्याबरोबर चर्चा करतोय असं नाहीय, तर अफगाणिस्तानातील राजकीय/सत्ता समीकरणात तालिबानची महत्त्वाची भूमिका आहे, हीच बाब ध्यातून घेऊन भारत त्यांच्यासोबत चर्चा करतोय असे आपल्याला वाटते" असे मुतलक बिन माजिद अल कहतानी म्हणाले. ते कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांचे विशेष दूत (special envoy) आहेत. (Indian officials engaging with Taliban quietly special envoy from qatar claim)
"माझ्या माहितीनुसार, भारतीय अधिकाऱ्यांच्या तालिबानसोबत गुपचूप भेटीगाठी सुरु आहेत. कारण तालिबान एक महत्त्वाचा घटक आहे किंवा भविष्यात अफगाणिस्तानात तालिबान महत्त्वाचा घटक ठरु शकतो" असे मुतलक बिन माजिद अल कहतानी वेबिनारमध्ये म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
NSA अजित डोवाल यांच्या निर्देशानुसार ही चर्चा सुरु आहे. सध्यातरी ही चर्चा अनौपचारिक स्तरावर आहे. मागच्या काही वर्षात वेगवेगळ्या स्तरावर तालिबान बरोबर अधुन-मधुन चर्चा झाल्या आहेत. तालिबानला अद्यापी भारताने मान्यता दिलेली नाही. कुठलाही करार, व्यवहारासाठी भारताचे अफगाणिस्तानात जनतेने निवडून दिलेल्या सरकार बरोबर चर्चा करायला प्राधान्य आहे.
तिथली परिस्थिती बदलली तर भारताला तालिबानबरोबर संवाद करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना या बद्दल विचारले असता ते म्हणाले की, "अफगाणिस्तानचं पुनर्निर्माण आणि विकासासाठी कटिबद्धता लक्षात घेऊन आम्ही तिथल्या वेगवेगळ्या घटकांच्या संपर्कात आहोत"
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.