झारखंड राज्यात नेहमी नक्षलवाद्यांची दहशत असते. राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातसुद्धा नक्षलवाद्यांनी दहशत पसरवली आहे. काल मध्यरात्री या जिल्ह्यातल्या बराकर नदीवरचा एक मोठा पूल आणि एक मोबाइल टॉवर नक्षलवाद्यांनी बॉम्बने उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोमुळे या भागातली वाहतूकही खोळंबली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे नक्षलवाद्यांनी घटनास्थळ सोडण्यापूर्वी तिथे एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती.
या चिठ्ठीत नक्षलवाद्यांनी अटक करण्यात आलेल्या नक्षलवादी प्रशांत बोस आणि त्यांच्या पत्नीला उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन केले आहे सोबत २१ ते २६ जानेवारी दरम्यान होऊ घातलेला प्रतिकार मोर्चा यशस्वी करण्यास या चिठ्ठीत नमूद केले आहे. या चिठ्ठीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गिरिडीह जिल्ह्यात सातत्याने नक्षलवाद्यांचा कहर सुरूच असतो. अशात मागील दोन तीन वर्षांपासून नक्षलवाद्यांनी या परिसरात आपला अड्डाच बसवलाय. मात्र मध्यरात्री असे अचानक एक मोठा पूल आणि एक मोबाइल टॉवर बॉम्बने उडवल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस आणि तेथील प्रशासनाची चिंता वाढली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.