...तेव्हा काश्मीर भारताचा भाग नसेल : वायको

Vaiko
Vaiko

चेन्नई : भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे.

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वायको यांनी काश्मीरच्या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. 

वायको म्हणाले, की भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असताना काश्मीर भारताचा भाग राहणार नाही. काश्मीरच्या प्रश्नावर मी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. भाजपने काश्मीरला गाळात घातले. काश्मीरच्या प्रश्नाला 30 टक्के काँग्रेस आणि 70 टक्के भाजप जबाबदार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com