कृषी कायदे रद्द करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची भारत बंदची हाक

देशपातळीवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा ; राजू शेट्टींचे वक्तव्य
कृषी कायदे रद्द करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची भारत बंदची हाक

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी येत्या 27 तारखेला संयुक्त किसान मोर्चाने भारत बंद पुकारला आहे. हा बंद शांततेत होणार असला, तरी सरकारी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, शाळा-महाविद्यालये बंद ठेवावी लागणार आहेत. बंदसंबंधी 20 सप्टेंबर रोजी मुंबईतही बैठक होणार आहे.

भारत बंदमध्ये अनेक शेतकरी संघटना सहभागी होत आहेत. बंद केवळ काही राज्यांपुरता मर्यादित न राहता, देशातून त्याला प्रतिसाद मिळावा म्हणून संयुक्त किसान मोर्चाने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतही एक बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय या बंददरम्यान काय काय बंद ठेवावे लागले, याची प्राथमिक माहिती या संघटनेने जारी केली आहे. तसेच या बंदमध्ये समाजातील सर्व वर्गातील नागरिकांना शेतकऱ्यांबरोबर उभे राहण्याचे आवाहन करण्याची सूचना विविध राज्यातील समन्वयक संघटनाना करण्यात आली आहे.

बंददरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, बाजारपेठा, उद्योग, शाळा-महाविद्यालयांसह विविध शैक्षणिक संस्था बंद ठेवाव्या लागणार आहेत. हा बंद पहाटे सहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहील. सार्वजनिक आणि खासगी वाहनेही रस्त्यावर आणता येणार नाहीत. या काळात सार्वजनिक कार्यक्रमही आयोजित करता येणार नाही. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, दवाखाने आदी आपत्कलीन सुविधा मात्र सुरू ठेवता येणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.

दिल्ली सीमेवरील सिघू, टिकरी, गाझीपूर सीमेवर गेल्या नऊ महिन्यापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यांची माघार घेण्याची मानसिकता नाही‌. आता तर सिंघू, टिकरी सीमेवर कबड्डी स्पर्धा शेतकऱ्यांनी आयोजित केली आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.

महाराष्ट्रात हा बंद यशस्वी होण्यासाठी शेतकरी संघटना एकत्र येत आहेत. येत्या 20 तारखेला मुंबईत त्यासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेनेचे संस्थापक राजू शेट्टी म्हणाले, "देशपातळीवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहेच. मुंबईतही होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहण्याचा प्रयत्न आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com