
१९६२ मध्ये लडाखमध्ये केवळ चार भाज्यांची लागवड केली जात होती, आता येथील शेतकरी सुमारे २५ भाज्या घेत आहेत. लेहच्या डीआरडीओच्या प्रयोगशाळेत ७८ भाज्यांवर काम केले जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीतही घेतल्या जात नाहीत, एवढ्या भाज्या आता लडाखमध्ये घेतल्या जात आहेत. जवानांसाठी उणे ४० अंशात भाज्या पिकवल्या जात आहेत
लेह - १९६२ मध्ये लडाखमध्ये केवळ चार भाज्यांची लागवड केली जात होती, आता येथील शेतकरी सुमारे २५ भाज्या घेत आहेत. लेहच्या डीआरडीओच्या प्रयोगशाळेत ७८ भाज्यांवर काम केले जात आहे. विशेष म्हणजे दिल्लीतही घेतल्या जात नाहीत, एवढ्या भाज्या आता लडाखमध्ये घेतल्या जात आहेत. जवानांसाठी उणे ४० अंशात भाज्या पिकवल्या जात आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुढील महिन्यात लडाखला देशांशी जोडणारे दोन्ही रस्ते बंद होणार आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम फळ भाजीपाल्यांच्या पुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांपर्यंत या भागात गरजा भागवण्यासाठी हवाई सेवेचा आधार घ्यावा लागेल. मात्र लेहमधील डीआरडीओच्या संशोधकांनी लडाखमधील शेतकरी आणि जवानांना प्रशिक्षण दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लडाखमध्ये तापमान उणे ३० ते ४० अंश असतानाही भाजीपाला घेणे शक्य होत आहे. हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाले तरी गलवान, प्यॉंगयॉंग, डेमचोक, दौलत बेग ओल्डी यासारख्या भागात भाजीपाल्याची टंचाई जाणवणार नाही.
सीमाभागात २०० खंदक ग्रीन हाउस
Edited By - Prashant Patil