Loksabha 2019 : राहुल गांधींसमोर पुन्हा स्मृती इराणींचे खडतर आव्हान

In UPs Amethi Smriti Irani To Take On Rahul Gandhi For A Second Time
In UPs Amethi Smriti Irani To Take On Rahul Gandhi For A Second Time

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीदरम्यान अमेठी मतदारसंघामधून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अशी लढत होणार आहे.

2014 मध्ये झालेल्या निवडणूकीदरम्यान राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता. दुसऱयांदा याच मतदारसंघामधून गांधी व इराणी पुन्हा आमने-सामने येणार आहेत. यामुळे मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे असल्यामुळे आगामी निवडणूक ही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार असून, दुसरीकडे स्मृती इराणी या केंद्रीय मंत्री आहेत. यामुळे दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

गेल्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना ४,०८,६५१ इतकी मते पडली होती; तर इराणी यांना ३,००,७४८ मते मिळाली होती. म्हणजेच, २०१४ च्या निवडणुकीत राहुल गांधींना १,०७,९०३ मतांनीच विजय मिळविता आला होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी तब्बल ३,७०,१९८ मतांनी विजय मिळविला होता. त्या पार्श्वभूमीवर इराणी यांनी गेल्या निवडणुकीत गांधी यांचे मताधिक्य लक्षणीयरित्या कमी केले होते.

दरम्यान, देशभरातील विविध सभांदरम्यान गांधी व इराणी हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना पहायला मिळतात. मात्र, अमेठी मतदारसंघामधील मतदार कोणाला स्वीकारतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com