शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार कोटींचा गैरव्यवहार- कमलनाथ

शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार कोटींचा गैरव्यवहार- कमलनाथ

भोपाळ- शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारवर त्यांनी हा आरोप केला. अनेक शेतकऱ्यांनी कर्जच घेतलेले नाही परंतु कर्ज घेतलेल्यांच्या यादीत त्यांची नावे आहेत. त्याचबरोबर, मेलेल्या शेतकऱ्यांच्या नावावरही कर्ज घेतले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कमलनाथ म्हणाले की, अनेक शेतकरी तक्रारी दाखल करत आहेत. या प्रकरणात लक्ष घालून कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असल्याचे सांगितले. आजही त्यांच्याकडे शेतकरी तक्रार दाखल करायला आले आहेत. त्याचबरोर, अनेक शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज नसूनही त्यांचे कर्ज माफ झाल्याचे दाखवण्यात आल्याचे कमलनाथ यांनी सांगितले.

तसेच, मध्य प्रदेशमध्ये 1000 गोशाळा सुरू करणार असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. यावरून त्यांनी भाजप सरकारवर टीकाही केली. गोशाळेसाठी आधीच्या सरकारने कुठलीही तरतूद केली नाही. गोशाळेचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यास अजून 06 महिने बाकी आहेत. यासाठी 450 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com