Manipur Violence: मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; पोलिसासह पाच जणांचा मृत्यू

Manipur Violence
Manipur Violenceesakal

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफळला आहे. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. राज्यातील विविध भागात हिंसाचार उसळल्यानंतर झालेल्या गोळीबाराच्या घटनांमध्ये लोकांचा मृत्यू झाला आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी दिलेल्या निवेदनात सांगितलं होत की, सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत कुकी जमातीचे ४० दहशतवादी मारले गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यात पुन्हा हिंसाचार झाला.

Manipur Violence
Maharashtra Sadan : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील त्या घटनेवर CM शिंदे अखेर बोललेच, म्हणाले...

या भागात हिंसा

हिंसाचारामागे काही अतिरेकी संघटनांच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांनी गोळीबार केला, त्यामुळे एका पोलिसासह पाच जणांचा मृत्यू झाला. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील फेंग भागात झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ककचिंग जिल्ह्यातील सुगानू भागात झालेल्या हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू झाला असून एक पोलिस जखमी झाला आहे. तर सहा नागरिकही जखमी झाले आहेत.

सुगानूमध्येच रविवारी सकाळी जमावाने पाच गावांतील कुकी जमातीच्या लोकांची घरे जाळली. इंफाळ पश्चिममध्येच भाजप आमदार केएच रघुमणी सिंह यांच्या घराला संतप्त जमावाने आग लावली. उरीपोक येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. येथेही दोन जण जखमी झाले. चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवी, इम्फाळ पूर्वेतील सागोमांग, बिशेनपूरमधील नुंगोइपोकपी, इंफाळ पश्चिममधील खुरखल येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या.

Manipur Violence
Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रेलिंगला धडकून कारला आग, होरपळून दोघांचा मृत्यू

ककचिंग जिल्ह्यातील सेरो, सुगानू येथे अतिरेक्यांनी मेईतेई समाजातील सुमारे 80 घरे जाळली. त्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही ठिकाणी पोलिस आणि दहशतवादी संघटनेच्या लोकांमध्ये चकमक झाल्याचेही वृत्त आहे.

अतिरेकी संघटना मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे

मणिपूरमध्ये दहशतवादी संघटना मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत. दरम्यान लष्कराने दहशतवादी संघटनांमधील संभाषण डीकोड केले आहे. त्यामुळे लष्कराला कळले आहे की दहशतवादी संघटना मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत आणि त्या हल्ल्यात मानवांना ढाल म्हणून वापरण्याची त्यांची योजना आहे. लष्करही याबाबत सतर्क झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com