नवी दिल्लीः अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19साठीचा अर्थसंकल्प आज (गुरुवार) सादर करताना देशभरातील जनतेच्या आरोग्याचा विचार प्राधान्यायाने केला आहे. परंतु, खरोखरच या आरोग्य विमाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल का? हा खरा प्रश्न आहे.
देशभरातील जनतेचा आरोग्याचा प्रश्न खरोखरच गंभीर आहे. गेल्या वर्षभरात गोरगरिबांकडे पैसे नसल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. अर्थमंत्री जेटली यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना आरोग्य विमावर भर दिला आहे. ही योजना व्यवस्थितपणे राबविली गेली तर नागरिकांना मोठा फायदा होईल. परंतु, ही योजना तळागाळा पर्यंत पोहलेच का, हा सुद्धा प्रश्न आहे.
अर्थसंकल्प सादर करताना दरवर्षी मोठ-मोठ्या योजना राबविल्या जातात. परंतु, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्या कितपत पोहचतात, हे अद्याप अनेकांना समजलेले नाही. आरोग्य विमा योजना तळागाळापर्यंत पोहचल्यास नागरिकांचे आरोग्य नक्कीच सुधारू शकेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.