आगामी निवडणुकीत जनताच मोदींचा पराभव करेल : केजरीवाल

arvind
arvind

नवी दिल्ली : नोटाबंदी, जीएसटीचा फटका देशातील नागरिकांना बसला आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनताच आव्हान उभे करेल आणि त्यांचा पराभव करेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच लोकांच्या मनात सरकारबद्दल मोठी नाराजी असल्याचेही केजरीवाल म्हणाले.

दिल्ली येथे आम आदमी पक्षाचे नेते अंकित लाल यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, केंद्र सरकारने लागू केलेल्या नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या निर्णयामुळे देशातील जनतेच्या मनात नाराजीचा सूर आहे. सरकारच्या या निर्णयाचा फटका सर्वसामान्य जनतेला फटका बसला आहे. त्यामुळे नाराज झालेली ही जनता त्यांच्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त करू लागल्याने आगामी निवडणूक जनताच लढवेल. 2019ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध जनता अशीच असेल, असे केजरीवाल म्हणाले. 

तसेच देशात सध्या सुरु असलेल्या धार्मिक राजकारणावर बोलताना ते म्हणाले, दलित-राजपूत, गोमाता, पद्मावती, हिंदू-मुस्लिम अशा मुद्यांवरून राजकारण केले जाते. पण जेव्हा पोटापाण्याची चिंता असते, तेव्हा माणूस जात-पात-धर्मभेद सर्वकाही विसरुन जातो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com