भाजप, विनोद राय यांनी माफी मागावी : काँग्रेस

p chidambaram
p chidambaram

नवी दिल्ली :  देशातील सर्वात मोठा घोटाळा असलेला 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने काँग्रेससह इतर पक्षाने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ''2जी घोटाळ्याबाबत करण्यात आलेले आरोप हे चुकीचे होते. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा झालाच नव्हता हे आज न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे", असे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. 

यूपीए सरकारच्या कार्यकाळात 1 लाख 76 हजार कोटींचा 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

"जशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. तसे त्यांनी काम केले आहे. कायद्याने चांगले काम केले आहे", असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सांगितले.

''देशात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. कोणतेही नुकसान झाले नाही. जर काही घोटाळा असेल तर तो खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. बँकिंग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. विनोद राय यांनी देशासमोर माफी मागितली पाहिजे", असे काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले.

डीएमकेचे नेते दुरई मुरुगन यांनी सांगितले, की विजयाची आता सुरवात झाली आहे. राजकीय विरोधकांकडून आमच्यावर आरोप केले जात आहे.

''या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान द्यायला हवे'', असे भाजप नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. 

''जर सरकारकडे याबाबत पुरावे असतील तर त्यांनी उच्च न्यायालयात जायला हवे'', असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे म्हणाले.

''ज्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांविरोधात खोटे बोलून देशाला मूर्ख बनवले. भाजपने यावर उत्तर द्यावे", अशी मागणी गुलाम नबी आझाद यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com