'यूपी'मध्ये शक्तीकुंज एक्सप्रेसचे 7 डबे घसरले, जीवितहानी नाही

रेल्वे अपघात (संग्रहित छायाचित्र)
रेल्वे अपघात (संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : जबलपूरकडे जाणारी शक्तीकुंज एक्सप्रेस उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात रुळावरून घसरली. या रेल्वेचे एकूण सात डबे घसरले. 

सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी हा अपघात झाला. घटनास्थळी आम्ही सर्व व्यवस्था केली आहे, असे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी सांगितले. सर्व प्रवाशांना उर्वरित डब्यांमध्ये बसविण्यात आले, आणि सकाळी साडेसात वाजेपर्यंत ते सर्वजण घटनास्थळावरून पुढे गेले. सर्व प्रवासी सुरक्षित असून अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. 

अपघात झाला तेव्हा ही रेल्वे गाडी जास्त वेगात नव्हती. ताशी 40 किमी एवढ्या वेगाने ती जात होती, त्यामुळे दुखापती झाल्या नाहीत. एका महिन्याच्या आतच उत्तर प्रदेशात तीनवेळा रुळावरून रेल्वे घसरून अपघात घडले आहेत. यापूर्वी 19 ऑगस्ट रोजी मुझफ्फरनगरमध्ये उत्कल एक्सप्रेस घसरून 22 लोक मृत्युमुखी, तर 156 जखमी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com